Font Problem

     
 
प्रस्तावना
अभंगगाथा
पक्षी
लघु कथा
अभंगरूपीचित्र
चरित्र
विश्व कोश
पुस्तक
लेख
कविता
भजन श्रवण
 
बाळगोपाळांसाठी
 
तुकाराम बीज
देहू दर्शन
रंगभूमी
कला दालन
 
पालखी
छत्रपती शिवाजी
 
महात्मा गांधी
 
बाबाजी परांजपे
 
संकेतस्थळाबद्दल
 
मुख्य पान
 
प्रतिक्रिया
मुखपृष्ठ

शोध तुकयाचा...

- गोपाळ जोशी

 

माऊली आणि तुकोबाराय हे अवघ्या मराठी मनांचे प्राण आहेत. दि. बा. मोकाशी यांनी आनंदओवरी या कादंबरीत तुकोबारायांचा मनोवेधक शोध घेतला आहे. याच कादंबरीची रंगावृत्ती दिग्दर्शक अतुल पेठे यांनी रंगमंचावर आणली आहे. अभिजात रंगभूमीने तिचा अतिशय उत्तम प्रयोग सादर केला आहे. एकपात्री असेच या प्रयोगाचे स्वरूप आहे. दि. बा. मोकाशींनी मात्र तुकोबांमधला माणूस आणि त्याचा संतत्वाचा प्रवासयांचाच वेध घेतला आहे. तथापि हा शोध ही सरळ घेतलेला नाही. आनंदओवरी म्हणजे तुकोबांच्या विठ्ठल मंदिरातील ओवरी. याच जागेवर बसून त्यांनी अभंग रचले. ही ओवरी तुकोबांच्या जीवनातल्या अनेक घटनांची साक्षीदार आहे. तुकोबांचे धाकटे बंधू कान्होबा नाटकात तुकोबांचा शोध घेत आहेत. नेहमी प्रमाणेच ते हरविल्याची कान्होबांची भावना होऊन ते तुकोबांना शोधत आहेत. मात्र शोधूनही तुकोबा न सापडल्याने कान्होबांना भावनावेग आवरत नाही.

कान्होबा जिथे जिथे जातात तिथे तुकोबांच्या आठवणी दाटून येतात. कान्होबा या शोधात तुकोबांची कहाणीच सांगत राहतात. मात्रती सांगतानाच तुकोबांच्या शोधाचे रूप पालटते. परिवर्तनशील संवेदनशील व कवी वृत्तीच्या भावाचा तीव्र कल्लोळ ते उलगडत राहतात. इथेच मोकाशींनी तुकोबांमधला माणूस उलगडून दाखविला आहे. तुकोबांच्या अभंगांचे मूळ काय तुकोबा की विठ्ठल,असा प्रश्न मोकाशी उपस्थित करतात.

कान्होबा फक्त तुकोबांचाच शोध घेत नाहीततर ते स्वतःचाआपल्या कुटुंबाचा व समाजाचाही वेध घेतात. इथे मोकाशी आपल्यासारख्या सर्वसामान्यांशी कान्होबांची नाळ जोडतात. त्यामुळे कान्होबा एकूणच जगण्याविषयी जे प्रश्न उपस्थित करतात ते फक्त त्यांचे न राहता आपलेही बनून जातात. त्याशिवाय कान्होबा सर्जनशील आहेत. त्यामुळे एका सर्जनशील माणसाची घालमेलही मोकाशी दर्शवून जातात.

ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांनी या प्रयोगाचे संकलन केले आहे, तर अतुल पेठे यांनी रंगावृत्ती तयार केली आहे. प्रयोगाचे दिग्दर्शन व संगीत संकल्पनाही त्यांचीच आहे. आनंदओवरीतले हे विविध पदर पेठेंनी रंगावृत्ती आणि प्रयोगात छानच फुलविले आहेत. नेपथ्य रंगमंच अवकाश व प्रकाश योजनेचा चपखल वापर प्रयोगात दिसून येतो. त्याचबरोबर लाईव्ह संगीतही प्रयोगाला वेगळीच रंगत प्राप्त करून देते. किशोर कदम या गुणी अभिनेत्याने कान्होबा अक्षरशः जिवंत केला आहे. त्यांची ही भूमिकाही दीर्घ काळ स्मरणात राहील अशीच आहे . देहबोली व आवाजाचा उत्तम वापर आणि गोळीबंद संवादफेक ही त्यांच्या अभिनयाची वैशिष्टे या प्रयोगात विशेषत्वाने जाणवत राहतात. श्रीकांत एकबोटे यांची प्रकाश योजना श्याम भूतकर यांची वेषभूषा अशोक गायकवाड यांचे संगीत व मकरंद साठे यांचे नेपथ्ययाही या प्रयोगाच्या जमेच्या बाजू आहेत..